Rahul Gandhi Vs BJP Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi Vs BJP : राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान केला: भाजप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं रण पेटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BJP On Rahul Gandhi Remark On Savarkar: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं रण पेटलं आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे हे तिन्ही पक्ष कमालीचे आक्रमक झाले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान केला, असं शेलार म्हणाले.

राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान करत आहेत. तो सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे. ज्या महाराष्ट्रात या सुपुत्राचा जन्म झाला, त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. तो झुकला नाही. त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, असे शेलार म्हणाले. (Maharashtra News)

आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) कडाडून टीका केली. सावरकरांच्या बाबतीत अपमानास्पद जेवढे काही करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. केवळ कालचं विधान नाही, तर स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांचे नोकर होते हे बदनामीकारक आहे पण त्याहीपेक्षा भयंकर काँग्रेसच्या अधिकृत मासिकामध्ये काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर हे समलैंगिक होते असा आरोप काँग्रेसने केला आहे, याकडे शेलार यांनी लक्ष वेधले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निष्ठा, श्रद्धा आणि देशप्रेम याच्यावर जेवढे आक्रमण करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे मराठी माणसाचा अपमान काँगेस करते आहे आणि शिवसेना सत्तेसाठी माती खात आहे. बोटचेपी भूमिका घेत आहे, असं टीकास्त्रही शेलार यांनी सोडलं.

बाळासाहेब ठाकरे यांनी मणीशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला कानशिलात जोडे मारले आणि भारत जोडो अभियानामध्ये आदित्य ठाकरे झप्पी मारत आहेत. आता आदित्य ठाकरे गप्प का आहेत? आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध का करत नाहीत? विपर्यासाचे राजकारण शिवसेना उद्धव ठाकरे गट करत आहे. इतिहास, मराठी माणूस, महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही. या देशातील कोणताही देशभक्त नागरिक शिवसेना उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या अपमानाबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, असेही आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT