'कोरोना बळींच्या नातेवाईकांचे ५० हजाराही वसूली सेनेने खाल्ले की काय?' Saam TV
मुंबई/पुणे

'कोरोना बळींच्या नातेवाईकांचे ५० हजाराही वसूली सेनेने खाल्ले की काय?'

'या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि महापालिका आयुक्तांनी माफी मागितली पाहिजे '

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : मोदी सरकारच्या (Modi Goverment) योजनेनुसार कोविडमध्ये (Corona) बळी गेलेल्याच्या वारसांना 50 हजार रुपये देण्याच्या योजनेत मुंबई महानगर पालिकेने आणि शिवसनेच्या राज्य सरकारने शेकडो लोकांना पैसे फक्त आणि फक्त कागदावर पैसे क्रेडिट झाल्याचं दाखवलं मात्र प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत आणि या घटनेला आता एक एक महिना झाल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

शिवाय हा केवळ शिवसेनेचा (Shivsena) कारभार असून तो किती बेशरम आहे हेच यामधून दिसतं आहे. त्यामुळे कोविडमध्ये बळी गेलल्या त्यांना मनस्ताप देणाऱ्या लोकांना तात्काळ पैसे दिले जावेत आणि या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि महापालिका आयुक्तांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काय आहे योजना -

कोरोना काळात कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने पन्नास हजार रुपयांचा निधी देण्याची योजना सुरु केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Saree Contrast Blouses: साध्या कॉटन साडीला स्टायलिश लूक देणार 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

SCROLL FOR NEXT