Uday Samant  saam tv
मुंबई/पुणे

Uday Samant On Barsu Project:'प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली पक्षाचे राजकारण करु नका', उदय सामंतांचा संजय राऊतांवर निशाणा

Latest News: 'दोन्ही राऊतांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे.', अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Priya More

Mumbai News: बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (Barsu Project) वाद आता चांगलाच वाढत चालला आहे. या प्रकल्पावरुन राज्य सरकारवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसंच विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर देखील त्यांनी यावेळी टीका केली. 'प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली पक्षाचे राजकारण करू नका. दोन्ही राऊतांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे.', अशी टीका त्यांनी यावेळी केली.

उदय सामंत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बारसू प्रकल्पावर टीका करणाऱ्या संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर टीका केली. त्यांनी यावेळी सांगितले की 'विनायक राऊतांनी कलम 144 चं उल्लघंन केलं म्हणून त्यांना ताब्यात घेतलं. प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली पक्षाचे राजकारण करू नका. दोन्ही राऊतांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे.' 'जिथे मोर्चा आहे तिथे विनायक राऊतांनी जावे. जिथे परिक्षण सुरु आहे तिथे ते का जात आहेत?, असा सवाल यावेळी उदय सामंत यांनी केला.

उदय सामंत यांनी यावेळी बारसूच्या जागेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवणाऱ्या ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला. 'पूर्वीच्या सरकारचं जे ध्येयधोरण ठरलेलं आहे त्यानुसार होत आहे. पत्र देताना ग्रामस्थांची चर्चा केली नव्हती. आता का एवढा टाहो फोडला जात आहे.', अशी टीका त्यांनी केली. तसंच, 'काही जणं पत्रव्यवहार करून वातावरण तापवत आहेत. शेतकर्यांना समोर आणून मागून राजकारण केलं जात आहे.' अशी देखील टीका त्यांनी केली.

'मुंबईतले समाजसेवक हे रिफायनरीच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. अजून कोणतंही नोटिफीकेशन निघालेलं नाही. त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना अन्य काहीही माहिती हवी असल्यास ती देण्यात येईल. पण राजकारण करु नका.', असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासोबतच, 'शेतकऱ्यांना तिथे पेटवण्यापेक्षा त्यांच्या चुली पेटवणं गरजेचं आहे. कुठेही दडपशाही करून हा प्रकल्प रेटायचा नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होणार अशी आमचीही भूमिका आहे. बेरोजगारीचा प्रश्न मिटवायचा आहे. तर त्याचाही विचार व्हायला हवा', असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT