Surabhi Jayashree Jagdish
ओल्या खोबऱ्याचं वाटण अनेक भाज्यांना चव आणि घट्टपणा देतं. पण प्रत्येक भाजीसोबत ते योग्यच ठरतं असं नाही. जाणून घेऊया कोणत्या भाज्यांमध्ये खोबऱ्याचं वाटण वापरू नये
कारल्याची कडू चव हीच त्याची ओळख असते. अशावेळी खोबऱ्याचं वाटण टाकल्यास मूळ चव बदलते. खोबऱ्याचा गोडसरपणा कारल्याच्या कडूपणाशी नीट जुळत नाही. यामुळे भाजीचा संतुलित स्वाद बिघडण्याची शक्यता असते.
भेंडी चिकट असल्यामुळे खोबऱ्याचं वाटण टाकल्यास भाजी अधिक चिकट होते. यामुळे भाजीचा टेक्स्चर खराब होतं. म्हणून भेंडीमध्ये साधे मसालेच अधिक योग्य ठरतात.
दोडका पाणचट भाजी असल्यामुळे खोबऱ्याचं वाटण टाकल्यास भाजी फार पातळ किंवा विचित्र टेक्स्चरची होते. दोडक्याची हलकी चव खोबऱ्यामुळे दबली जाते. यामुळे भाजीची नैसर्गिक चव लागत नाही.
पडवळाची चव हलकी आणि किंचित कडवट असते. त्यामुळे खोबऱ्याचं वाटण त्याला योग्य बसत नाही. खोबऱ्याचं वाटण टाकल्यास भाजीची चव बिघडू लागते.
गवारमध्ये किंचित कडूपणा आणि विशिष्ट वास असतो, जो खोबऱ्यासोबत मिसळल्यास विचित्र चव लागू शकते शकतो. खोबऱ्यामुळे गवारची भाजी पचायला अवघड होते. म्हणून गवार साध्या मसाल्यांतच बनवावी.
शेवग्याच्या शेंगांची एक वेगळी चव असल्यामुळे खोबऱ्याचं वाटण त्यावर होतं. यामुळे भाजीचा मूळ सुगंध कमी होतो. साध्या मसाल्यात किंवा आमटीत शेवग्याच्या शेंगा अधिक चविष्ट लागतात.
कोबीच्या खोबऱ्याचं वाटण टाकल्यास भाजी जास्त मऊ होते. खोबऱ्यामुळे कोबीचा हलका कुरकुरीतपणा कमी होतो. म्हणून कोबी साध्या फोडणी किंवा कोरड्या प्रकारात अधिक चांगला लागतो.