नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी- आशिष शेलार Saam Tv
मुंबई/पुणे

नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी- आशिष शेलार

समीर वानखेडे यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणे हे भाजपचे काम नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : मुंबई पार्टी प्रकरणी NCP विरुद्ध BJP अशी आरोपांच्या मालिका सुरु आहेत. रोज नवनवीन खलबजानक खुलासे होत आहेत. नवाब मलिकांच्या आरोपांवर भाजप ही उत्तर देत आहे. तर कालच देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी दिवाळी नंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे. तर आज भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनीही पत्रकार परिषद घेत नवाब मालिकांना काही सवाल केले आहेत.

हे देखील पहा-

...आधीच या लोकांनी कसे कानावर हात ठेवले;

आशिष शेलार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून काही मंत्र्यांचे फुसके बार आपण ऐकले आहेत. दिवाळीनंतर जो बॉम्ब देवेंद्र फडणवीस हे फोडणार तो फुटण्या आधीच या लोकांनी कसे कानावर हात ठेवले हे आजच्या पत्रकार परिषदेतून समोर आले आहे.

समीर वानखेडे यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणे हे भाजपचे काम नाही;

समीर वानखेडे यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणे हे भाजपचे काम नाही. मुद्दाम विषय कुठे भरकटवण्याचा विषय केला तरी. 200 मिलिग्राम जरी ड्रग्स मिळाले तरी एनसीबीने कारवाई केली पाहिजे ही अशी मागणी आशिष शेलारांनी केली आहे.

माहिती लपवण्याचे कारण काय?

नवाब मलिक हे सर्वसाधारण माहिती देत आहेत. आज त्यांनी समीर वानखडे यांचे कपडे, बूट हे विषय काढले. तुमचा जावई आठ महिने अटकेत असताना ही माहिती होती ना मग ती का लपवली? तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय? याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे असे आशिष शेलार म्हणाले.

नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी!

तसच, या सर्व लपवालपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या दोघांची नार्कोटेस्ट करावी जे मंत्री सरकारची ढाल पूढे करून पोलीस यंत्रणा समोर जात नाही आहेत. कोर्टात जात नाही त्यामुळे नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी. ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांना आणि ज्यांनी आरोप केले त्यांना समान न्याय राज्य सरकारने न्याय द्यायला हवा नाहीतर अस होईल की सरकारचा या कटकारस्थानात सहभाग आहे.

'हे' राज्याच्या प्रतिमेला तडा देणारा प्रसंग आहे;

आशिष शेलार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून झालेल्या अटकेबद्दल बोलताना म्हणाले, जे सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम करत होते त्यांना अटक करावी लागली हे राज्याच्या प्रतिमेला तडा देणारा प्रसंग आहे. पोलीस यंत्रणा 100 कोटी वसुली करण्यासाठी वापरली जाते. वाझेना संरक्षण देण्यासाठी पोलीस यंत्रणा वापरली जात आहे. सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचा हा उपदवाप आहे. इतके दिवस कारवाईतून पळ काढणे हे अपेक्षित नव्हते. किमान पवार साहेबांचा तरी आदर्श ठेवायला हवे. पवार स्वतः म्हणाले होते मी ईडीची नोटीस येण्याआधी ईडी करालयात जातो. तो तरी आदर्श तरी ठेवायला हवे होते असा टोला त्यांनी यावेळी पवारांना लगावला.

याचे स्पष्टीकरण अजित पवार देतील;

शेलार अजित पवार यांच्या साखर कारखान्यावर सुरु असलेल्या कारवाईबद्दल म्हणाले, आयकर विभागाची कारवाई टप्याटप्याने सुरू आहे. राज्य सरकारची ही कारवाई नाही. याचे स्पष्टीकरण अजित पवार देतील आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देतील. चौकशी सर्वांची झाली पाहिजे. तपास यंत्रणांचे हे काम आहे. कोट्याचे कोटी प्लॅट आणि कोट्यवधी इन्कम एकट्याचे होऊ शकत नाही

आशिष शेलार मंत्री नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर म्हणले, नवाब मलिक यांच्या आरोपांचा स्थर मोठी नदीच्याही खालचा आहे. नवाब मलिक यांनी आता त्यांचे नाव खयाली मलिक असे ठेवायला हवे. मुंबईतील नेत्यांचे सीसीटीव्ही बाहेर आले तर तुमची पळता भुई थोडी होईल.

आंतरराष्ट्रीय ड्रग्स डीलर्सना वाचवण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे;

ड्रग्सच्या विरोधात आपल्या देशातील युवकांना वाचवण्यासाठी एक मोठे युद्ध केंद्र सरकार लढत आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्स डीलर्सना वाचवण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. केंद्राने आयटी ऍक्ट कायद्याला या लोकांनी विरोध केला आहे. हे आंतरराष्ट्रीय दलाल ज्यांना या कारवाया नको त्यांची दलाली तर नवाब मलिक करत नाही ना असा संशय निर्माण होत आहे.

महाराष्ट्र सरकार परमबीर सिंग यांना पळायला मदत करतंय;

परमबीर सिंग यांच्या नॉट रिचेबल प्रकरणावर आशिष शेलार म्हणाले, परमबीर राज्यातून पळून गेला कसा याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे. परमबीर पळून गेला त्यांचे निवासस्थान इथेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करतंय. ते ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय. कारण परमबीर यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे त्यामुळे याच सरकार पळायला मदत करतंय.

...बदनामीचा कार्यक्रम राष्ट्रवादीने हाती घेतला आहे का?

पुढे संजय राऊत बद्दल ते म्हणाले, संजय राऊत यांच्या पत्नी आमच्या वहिनी आहेत. आम्हाला कुणाच्याही पत्नी आणि मुलांबद्दल आक्षेप नाही. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला बदनाम करणे हा बदनामीचा कार्यक्रम राष्ट्रवादीने हाती घेतला आहे का?

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT