Doctor Sadanand And Pallavi Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Zero Snake Death: सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी 'Zero Snakebite Death' मिशन, नारायणगावमधील दाम्पत्याचा उपक्रम

Zero Snake Death Campaign: सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच नारायणगाव एका डॉक्टरांनी शून्य सर्पदंश मृत्यू (Zero Snake Death) हा उपक्रम सुरु केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Zero Snake Death Campaign By Narayangaon Doctor:

साप हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. परंतु सर्पदंशामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सापांमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढली आहेत. त्यामुळेच नारायणगाव येथील डॉ. सदानंद आणि पल्लवी राऊत यांनी 'शून्य सर्पदंश मृत्यू' (Zero Snakebite Death) हा उपक्रम हाती घेतली आहे.

सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. २०२२ च्या अभ्यासानुसार, देशात सुमारे ६४,००० लोकांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ज्यात ग्रामीण भागातील मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे डॉ. सदानंद आणि पल्लवी राऊत यांनी हा उपक्रम राबवला आहे. (Latest News)

कोब्रा चावल्याने एका मुलीच्या दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर डॉ. सदानंद यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीन आणि ऊस यांसारखी पिके घेणाऱ्या प्रदेशात सापांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना याचा सामना करावा लागतो.

मागील २८ वर्ष डॉ. सदानंद आणि पल्लवी राऊत हे काम करत आहे. त्यांनी रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणे आणि सर्पदंशावर अँटीवेनम डोस उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे जवळपास ६ हजार सर्पदंश झालेल्या लोकांना वाचवले आहे.

डॉ. सदानंद आणि पल्लवी खेडेगावात, शाळांमध्ये, वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात. विषारी साप ओळखण्यासाठी हजारो लोकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

SCROLL FOR NEXT