Yavatmal News
Yavatmal News संजय डाफ
महाराष्ट्र

संतापजनक: आधार कार्ड नसल्याने प्रसुती वेदना सुरु असताना महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास नकार

संजय डाफ

यवतमाळ: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील मारेगाव ग्रामीण रुग्णालयातून (Morgaon Rural Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गरीब कुटुंबातील गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सुरु असताना तिच्याजवळ आधार कार्ड नसल्याने तिला रुग्णालयातून परत पाठविल्याची घटना घडली आहे.

अर्चना सोळंके असं या गर्भवती महिलेचं नाव आहे. प्रसुती वेदना सुरु झाल्यामुळे त्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांच्याजवळ आधार कार्ड नसल्याने त्यांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आलं. शिवाय केवळ आधार कार्ड (Adhar Card) नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॅाक्टरांनी त्यांची प्रसुती करण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला रात्रीच्या वेळी रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेल्या होत्या. शिवाय त्यांच्या अंगात रक्ताची कमतरता देखील होती. मात्र, आधार कार्ड नसल्याने त्यांना रुग्णालयात घेण्यास नकार देण्यात आला होता.

दरम्यान, सदर महिलेकडे प्रसुतीसाठी पैसे नसल्याने त्यांना रुग्णालयात घेण्यास नकार दिल्याची घटना काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करत महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केलं.

त्यानंतर लोढा रुग्णालयात प्रसुती झाली असून बाळ आणि आई सुखरुप असल्य़ाची माहिती मिळाली आहे. शिवाय सदर महिलेला रुग्णालयातून परत पाठविणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील संबंधीत सरकारी डॅाक्टरांवर कारवाईची मागणी देखील या सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT