यवतमाळच्या कळंब नगरपंचायत निवडणुकीत २४ वर्षाच्या विजय चव्हाणने मारली बाजी! SaamTvNews
महाराष्ट्र

यवतमाळच्या कळंब नगरपंचायत निवडणुकीत २४ वर्षाच्या विजय चव्हाणने मारली बाजी!

विजय चव्हाण या पारधी समाजाच्या युवकाने निवडणूकीत बाजी मारल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ : पारधी समाज म्हटलं की रानावनात भटकून शिकार करून उदर निर्वाह करणारा उपेक्षित समाज डोळ्यासमोर उभा राहतो. कुठं तरी बेड्यावर निर्वासित जीवन जगणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असतात. हल्ली या समाजात शैक्षणिक जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.

हे देखील पहा :

मात्र, हा समाज राजकीय प्रवाहापासून कोसो दूरच आहे. मात्र, यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील कळंब (Kalamb) नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat) प्रभाग क्रमांक ११ मधून पारधी समाजाचा विजय चव्हाण (वय २४ वर्षे) या युवकाने सर्व राजकीय प्रस्थापितांना मागे टाकत विजय मिळवला आहे. शिवसेनेकडून (Shivsena) विजय चव्हाण याला उमेदवारी देण्यात आली होती. निवडणूक आखाड्यात उतरल्यानंतर विरोधकांकडून या नवख्या उमेदवाराला पराभूत करण्याचे अनेक प्रयत्न झाले.

मात्र, विजय चव्हाण ने भाजपचे (BJP) सतीश मरापे आणि काँग्रेसचे (Congress) विष्णू उईके यांना चारही मुंड्या चीत करित विजय मिळवला. विजय चव्हाण यांना ३२१ मते पडली. तर, भाजपचे सतीश मरापेंना १७४ आणि काँग्रेसचे विष्णू उईकेंना १५९ मते मिळाली. दरम्यान, विजय चव्हाण या पारधी समाजाच्या युवकाने निवडणूकीत बाजी मारल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्या विजयाची सर्वदूर चर्चा होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT