Nandurbar: The work of the memorial of the martyred tribal brothers should be completed soon - the demand of the citizens दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar: शहीद आदिवासी बांधवांच्या रखडलेल्या स्मारकाचं काम लवकर पूर्ण करावं - नागरिकांची मागणी

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रज सैनिकांच्या अमानुष गोळीबाराची साक्ष म्हणून रावलापाणी (Rawalapani) येथील निझरा नदीपात्रातील दगडावर असलेल्या गोळीबाराच्या (Firing) खुणा येथील समाज बांधवांनी आजही जतन करून ठेवल्या आहेत. शहीद वीरांची आठवण चिरस्मरणात राहावी व समाजातील तरुणांसाठी एक प्रेरणास्थान निर्माण व्हावे म्हणून एक भव्य स्मारक (Monument) होणे गरजेचे आहे. स्मारकासाठी 2018 साली पर्यटन विभागाच्यावतीने कामाला सुरुवात झाली खरी परंतु पायाभरणीनंतर काम ठप्प झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रावलापाणी येथील शहीद यांच्या स्मृती स्थळाची निर्मिती शासनाने दखल घेऊन पूर्ण करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (The work of the memorial of the martyred tribal brothers should be completed soon - the demand of the citizens)

हे देखील पहा -

रावलापाणी येथील या घटनेला आता 80 वर्ष पूर्ण होत आहे. येथील वातावरणात देशप्रेम, स्वातंत्र्याबद्दलची ओढ, भक्ती आणि त्याच सोबत निडरता आजही ठासून भरल्याचे जाणवते. शहिद बांधवांची आठवण म्हणून रावलापाणी येथे दर वर्षी २ मार्चला आदिवासी (Adivasi) बांधवांकडून सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतो. यावर्षी मोठ्या उत्साहात सामुहिक पद्धतीने शहिदांना श्रद्धांजली (Tribute) अर्पण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024: दिव्यांनी उजळून निघाला गड सारा ! नवरात्रीत महाराष्ट्रातील 'या' मंदिरात भाविकांची गर्दी

Health Tip: वारंवार पाव खाणं आरोग्यासाठी ठरु शकते घातक!

Kalyan News : रोषणाईसाठी मीटरमधून घेतलेले कनेक्शन काढले; तिघांनी केली बेदम मारहाण

Maharashtra News Live Updates: धुळे जिल्ह्यात वादळीवारासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान

Maharashtra Cabinet Meeting : राज्य सरकारचा धडका; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकाच दिवशी घेतले ८० निर्णय

SCROLL FOR NEXT