दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा

भादा स्टेशन अंतर्गत असलेल्या 45 गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार हे उध्वस्त होत आहेत यामुळे 45 गावातील महिला, अपंग पुरुष, युवक-युवतींचा मोर्चा धडकला आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा स्टेशन अंतर्गत असलेल्या 45 गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार हे उध्वस्त होत आहेत यामुळे 45 गावातील महिला अपंग पुरुष युवक युवतीचा मोर्चा धडकला आहे. औसा तालुक्यातील भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून आज मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात सहभागी असलेल्या महिलांनी अक्षरश: देशी दारूच्या बाटल्या व कोंबडी डोक्यावर टोपलीत मध्ये घेऊन भादा ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. (Women and the disabled marched on Bhada Thane with alcohol and hens)

हे देखील पहा -

या मोर्चामध्ये महिला युवक-युवती यांचा आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला. भादा ठाण्याच्या आवारातच मुख्य इमारती समोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सोनाली गुलगुले, माधुरी पाटील, राणी स्वामी, रामप्रसाद दत्त, प्रा विजय सुतार, चंद्रकांत ढवण यांच्यासह 45 गावातील महिला-पुरुष युवक-युवती व अपंग यांनी ठिय्या मांडला.

दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा

यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दारुमुळे कशा पद्धतीने कुटुंबाची राखरांगोळी होत आहे याबद्दल आक्रोश आणि संताप व्यक्त केला. काही बेवड्यांनी दारूच्या नादात शेती विकली तर महिला व मुलांना मारहाण हा नेहमीचा भाग आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत 45 गावात अवैधपणे देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री होते. या अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाकडून हप्ते घेऊन संरक्षण दिला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात निखील पिंगळे यांनी पोलिस अधीक्षक पदांचा पदभार घेतल्यानंतर अवैद्य धंदे विरुद्ध मोठी मोहीम राबवत कारवाई सुद्धा केली. यामुळे अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले पण भादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू, गुटका, मटका, गांजा यांचे मोठ्या प्रमाणात विक्री होते.

वर्षाकाठी सरासरी 50 लोकांचा यात जीव जातो, त्यावर अवलंबून असणारे 250 व्यक्ती यांचे देखील जीवन उद्ध्वस्त होते. यामुळे या ठाण्याच्या हद्दीत असलेले बीट अंमलदार गिरी आणि डोलारे यांची तात्काळ बदली करण्यात यावी व एक महिन्याच्या आत सर्व अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा छेडण्याचा इशारा दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'प्रत्येकाचं शरीर वेगळे असतं...'; सलमान खानसमोर रडली अशनूर कौर, म्हणाली- लाज वाटली पाहिजे...

Raigad Tourism : पांढरी शुभ्र वाळू अन् निळाशार समुद्र; रायगडमधील बेस्ट कपल स्पॉट

Pankaj Tripathi Mother Death : प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; 89 व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

Shocking News : मित्रानेच घात केला! फिरायला घेऊन जातो सांगून घेऊन गेला; निर्जनस्थळी नेत मैत्रिणीवर बलात्कार

Horoscope Monday: आर्थिक बोजा वाढणार! आरोग्याच्या समस्या वाढतील,वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT