अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी मोठी घोषणा केलीय.त्यामुळे यावेळी तरी शेतकऱ्याचा सातबारा खरंच कोरा होणार का? राज्यातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
कधी दुष्काळाने पिचलेल्या, अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.मात्र आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटलेत.शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. आणि त्यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कर्जमाफीची तारीखच जाहीर केलीय.
खरंतर विदर्भ आणि मराठवाड्यात 2025 मध्ये 1 हजार 987 शेतकऱ्यांनी तर 2026 च्या जानेवारीमध्ये 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय.त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली जात होती. आतापर्यंत 3 वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मात्र त्यानंतरही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलाच आहे. त्यामुळे आता कर्जमाफीसंदर्भातील उच्चस्तरीय समितीचा वेळेत अहवाल येणार का? आणि शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा केला जाणार का? याकडे राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.