रानटी जनावरांचा धुमाकूळ  प्रसाद नायगावकर
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये रानटी जनावरांचा धुमाकूळ !

झरी तालुक्यात रानटी जनावरांचा शेतांमध्ये वावर वाढला आहे. रानटी जनावरे शेतात येऊन छोट्या अन् नुकत्याच उगवलेल्या पिकांची नासधूस करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद नायगावकर

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा हा वनसंपदेने संपन्न असा जिल्हा आहे. जंगलक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने जिल्ह्यात अनेक जंगली प्राणी आढळतात. मात्र याच जंगली प्राण्यांमुळे सध्या यवतमाळमधील शेतकरी त्रस्त झाले आहेत. Wild animals plague farmers in Yavatmal

झरी तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. अनेक शेतकऱयांनी आपल्या शेतामध्ये बियाणांची पेरणी देखील केली आहे. नुकतीच पेरणी केली असल्याने शेतात पीक वाढीस अद्याप अवधी आहे.

हे देखील पहा -

अशातच झरी तालुक्यात रानटी जनावरांचा शेतांमध्ये वावर वाढला आहे. रानटी जनावरे शेतात येऊन छोट्या अन् नुकत्याच उगवलेल्या पिकांची नासधूस करत आहेत. झुंडीने येणारी हि जनावरे शेतकऱयांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहेत.

झरी तालुक्यातील शेतकऱयांना रानटी जनावरांचा नाहक त्रास होऊन त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या आधीचा शेती हंगाम हा अवकाळी पावसाने गेला. या हंगामात तरी भरघोस उत्पन्न मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना आता रानटी जनावरांकडून होणाऱ्या उपद्रवास सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

या रानटी जनावरांकडे वनविभाग प्रशासनाने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माऊलीच्या पालखीचं पुण्याहून सासवडकडे प्रस्थान

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT