Ramesh Bais Saam Tv
महाराष्ट्र

Ramesh Bais : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत?

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ramesh Bais New Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. यासह देशातील १२ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहे.

कोण आहेत रमेश बैस?

रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी जुलै 2019 ते जुलै 2021 त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. रायपूर लोकसभेचे सलग सहा वेळा खासदार निवडून आले आहेत. ऑक्टोबर 1999 ते सप्टेंबर 2000 केंद्रीय रसायन राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.

सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. जानेवारी 2004 ते मे 2004 केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या १२ राज्यपालांची यादी

लक्ष्मण प्रसाद आचार्य - सिक्किम

शिव प्रताप शुक्ला -हिमाचल

गुलाब चंद्र कटारिया -असाम

बीडी मिश्रा - लद्दाख

रमेश बैस - महाराष्ट्र

अब्दुल नजीर - आंध्र प्रदेश

एल. गणेशन - नागालैंड

सीपी राधाकृष्णन - झारखंड

बिस्वास भूषण हरिचंदन - छत्तीसगढ

लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक - अरुणाचल प्रदेश

अनुसुईया उईके - मणिपूर

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर - बिहार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT