बीड जिल्ह्यात अद्याप जनजीवन विस्कळीत, पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात अद्याप जनजीवन विस्कळीत, पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने, जिल्ह्यातील सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मांजरा आणि माजलगाव धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तर जिल्ह्यातील मांजरा, सिंदफणा, गोदावरी वाण, सरस्वती, बोभाटी, कुंडलिका, बिंदुसरा नद्यांसह अनेक नद्यांना, गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात तुफान पूर आला होता. यामुळं आपेगाव, देवळा, पारगाव शिमरी, रेवकी, राजापूर, यांसह अनेक गाव पाण्यात गेली होती.

हे देखील पहा -

दरम्यान आज अनेक भागातील पुराचं पाणी कमी होत आहे. मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे. गावखेड्यातील नदीवरील पूलं वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. विद्युत डीपी, पोल, तारांची पडझड झाल्यानं अंबाजोगाई तालुक्यातील अपेगाव, देवळा गावांसह अनेक गावांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून लाईट नाही. त्यामुळं स्वच्छ पाणी,आटा, मोबाईल चार्जिंग यासह अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. शेतात राहणाऱ्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

तर केज - अंबाजोगाई महामार्गावरील पूल काल वाहून गेला असून अद्याप हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. तर दुसरीकडे बिंदुसरा धरणाच्या चादरीवरून वाहणाऱ्या पाण्याने रौद्ररूप धारण केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT