करणी-भानामती केल्याच्या संशयावरुन चंद्रपुरात दलित कुटुंबाला मारहाण  Saam Tv News
महाराष्ट्र

करणी-भानामती केल्याच्या संशयावरुन चंद्रपुरात दलित कुटुंबाला मारहाण

पिडीत कुटुंबातील सात जणांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुरोगामी महाराष्ट्राला (Maharashtra) कंलकित करणारी धक्कादायक घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून समोर आली आहे. करणी-भानामती (Balck Majic) केल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी एका दलित कुटुंबातील सात जणांना भरचौकात हातपाय बांधून बेदम मारहाण (Dalit family beaten by villagers) केली आहे. पिडीत कुटुंबातील सातही जण गंभीर जखमी झाले असून, त्यातली पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. पिडीत कुटुंबातील सातही जणांवर चंद्रपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील वणी खुर्द गावात ही घटना घडली आहे. करणी भानामती केल्याच्या संशयावरुन वणीखुर्द मधील दलित कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाणी केली. कोणताही पुरावा नसताना केवळ अंधश्रद्धेला बळी (Crime under Superstition) पडत गावकऱ्यांनी संबंधित कुटुंबाला मारहाण करत क्रूरतेचा कळस गाठला आहे. मात्र दुर्देवाची बाब म्हणजे २४ तास उलटून गेल्यानंतरही पोलीसांनी यावर कोणतीही कारवाई केल्याची माहिती नाही.

याउलट या घटनेबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याचं म्हटल जात आहे, पण किती लोकांवर गुन्हा दाखल केला, आणि किती लोकांना अटक केली, याबाबत पोलीस कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत.

नेमकं काय आहे प्रकरण?

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी संचारली होती. देवी संचारलेल्या महिलांनी सांगितले की, गावातील दलित समाजातील 8 ते 10 पुरुष आणि महिलांनी गावावर भानामती केली आहे. या भानामतीच्या संशयावरुन गावकऱ्यांनी संबंधित कुटुबांला भरचौकात आणलं.

त्यांचे हातपाय खांबाला बांधले आणि त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत पिडीत कुटुबांतील ७ जणांपैकी ५ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबियांना मारहाण होत असताना गावातील लोकही भितीने मध्ये पडले नाहीत. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता.

या घटनेबाबत गडचांदूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी माहिती दिली आहे. जादूटोणा- भानामतीच्या संशयावरु वणी खुर्द या गावातील एका कुटुंबातील सात जणांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी त्यांना सोडवले असून याप्रकरणी गावातील काही जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.'

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Repo Rate : नव्या वर्षात EMI कमी होणार, RBI पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Shocking : पुण्यातून निवडणूक निकालसाठी गावाकडे गेला अन् खून झाला, चाकू-काठीने बेदम मारलं, लातूरमधील धक्कादायक घटना

Politics: ठरलं तर मग! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, २५-२६ डिसेंबरला करणार घोषणा

Diabetes skin symptoms: त्वचेवर दिसतात ही ७ लक्षणं, लगेच व्हा सावध, कधीही कंट्रोल न होणारा डायबेटिस होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT