Aurangabad Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद महापालिकेला १७ मे 'अल्टिमेटम', पण प्रभागरचनेचा नकाशा रखडला

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेला 17 मे पर्यंत प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिले असले तरी 17 मे पर्यंत औरंगाबाद शहरातील प्रभाग रचनेचा आराखडा तयार करणे शक्य होणार नसल्याचे समोर आलं आहे. कारण निवडणूक आयोगाकडून शहराचा नकाशा अद्याप देण्यात आला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

त्यामुळे औरंगाबाद शहराचा प्रभाग आराखडा तयार करण्यास बराच उशीर लागणार आहे. औरंगाबाद महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाल 20 एप्रिल 2020 रोजी संपला. त्याला आता दोन वर्षे झाली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे.

हे देखील पाहा -

देशातील कोणत्याही महापालिकेच्या इतिहासात इतका काल प्रशासक असल्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी. आता विलंब झाला असतानाही पहिल्या टप्प्यात निवडणूक न होता दुसऱ्या टप्प्यात होणार असल्यानं आणखी किती काळ असाच प्रशासकाचा राहतो, हे पहावं लागणार आहे.

कारण महाराष्ट्रातील १४ महापालिकांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. मात्र, त्यासाठीही प्रभाग रचनेचीतयारी संथगतीने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT