ऐकलंत...फडणवीसांनी गेल्या निवडणुकीच्या प्रचारात दिलेली ही घोषणा....आता याच कर्जमाफीच्या घोषणेवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय. उद्धव ठाकरे नुकसानग्रस्तांच्या भेटीसाठी मराठवाड्यात दुसऱ्यांदा दौऱ्यावर गेले आहेत...या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कर्जमाफीच्या मुद्यावर भर दिलाय. कर्जमाफीवरून ठाकरेंनी महायुती सरकारला घेरण्याची रणनीती आखलीय. उद्धव यांनी शेतकऱ्यांसमोर थेट लाव रे तो ऑडीओ म्हणत फडणवीसांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची क्लीपच ऐकवली....तर फडणवीसांनीही या दौऱ्यावरून ठाकरेंना टोला लगावलाय.
शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले. त्यानंतर सरकारने कर्जमाफीसाठी तारीख जाहीर करत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरेंनी मात्र लगेच कर्जमाफीसाठी आग्रह धरलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगूल वाजलंय. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरूनच ही निवडणूक गाजणार असल्याचं दिसतंय एवढं मात्र निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.