Uday Samant-manoj jarange Saam TV
महाराष्ट्र

Maratha Arakshan : CM शिंदेंचा खास संदेश घेऊन उदय सामंत विशेष विमानानं मनोज जरांगेंच्या भेटीला

Political News : उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने जालनासाठी रवाना होत आहेत.

सूरज सावंत

Jalna News :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागील १५ दिवसापासून आंदोनल सुरु आहे. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे अशा विनंतीचा ठराव सर्वपक्षीय बैठकीत काल मंजूर झाला. उपोषणामुळे मनोज पाटलांची प्रकृती देखील खालावली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास संदेश घेऊन विशेष विमानाने जालन्यातील आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.

उदय सामंत आज जळगावात 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी होणार होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना विशेष संदेश देऊन मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने जालनासाठी रवाना होत आहेत. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपोषण विनंती केली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी मी उपोषण सोडण्यास तयार आहे, मात्र उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी यावं अशी अट ठेवली आहे.

तसेच महिनाभर गावात साखळी उपोषण सुरू करायचे आहे. पुढच्या महिन्यात 12 तारखेला मराठ्यांची इतकी मोठी सभा होईल, असेही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT