आता २ तास ५५ मिनिटांत होणार नाशिकरोड ते मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवास Saam Tv
महाराष्ट्र

आता २ तास ५५ मिनिटांत होणार नाशिकरोड ते मुंबईपर्यंतचा रेल्वे प्रवास

ईगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ रेल्वेस्थानकात थिक वेब स्विच प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक - नाशिकरोडहून Nashik आता रेल्वेने 2 तास 55 मिनिटांत मुंबईला Mumbai पोहोचणे शक्य होणार आहे. कारण या रेल्वे Railway मार्गावरील रेल्वेस्थानकांवर थिक वेब स्विच प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली आहे. ईगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ रेल्वेस्थानकात थिक वेब स्विच प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा सध्याचा वेग सरासरी ताशी 110 ते 120 किलोमीटरचा वेग वाढवून तो ताशी 140 ते 160 किलोमीटर करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. 

हे देखील पहा -

सद्यस्थितीत रेल्वेस्थानकात ट्रॅक बदलतांना गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे गाडीतील प्रवाशांनाही झटका बसतो. मात्र गाड्यांचा वेग वाढवल्यानंतर ट्रॅकवरील जॉईंट बदलतांना प्रवाशांना झटका बसू नये, यासाठी आता रेल्वेस्थानकात सामान्य स्विचऐवजी थिक वेब स्विच प्रणाली बसवण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे गाड्यांचा वेग ताशी 140 ते 160 किलोमीटरपर्यंत वाढवल्यानंतरही ट्रॅक बदलताना गाड्यांचा वेग कमी करण्याची आवश्यकता भासणार नाही तसंच प्रवाशांनाही धक्का बसणार नाही, तर प्रवासाच्या वेळेतही तब्बल 25 टक्के बचत होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT