Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: वॉटर ग्रीडमधून ३८ गावांची भागणार तहान; ४८१ कोटींच्या योजना प्रकल्पाला वेग

वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून जळकोट तालुक्यातील ३८ गावांत मुबलक प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

दीपक क्षिरसागर

Latur News: वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून जळकोट तालुक्यातील ३८ गावांत मुबलक प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठीच्या ४८१ कोटींच्या कामांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी येथे कार्यालयही सुरू करण्यात आले आहे, तसेच जलशुद्धीकरण केंद्राची जागाही जवळपास निश्चित करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

वॉटर ग्रीडअंतर्गत जळकोट आणि उदगीर तालुक्यात जवळपास १२९ गावे आहेत. त्यात जळकोटमधील ३८ तर उदगीर तालुक्यातील ९१ गावे आहेत. जळकोट- वांजरवाडाच्या मध्यभागी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार असून, तिथे दोन संतुलित जलकुंभही उभारण्यात येणार आहेत. जळकोट तालुक्यात पाच तर उदगीरात सात जलकुंभ उभारले जाणार आहेत. कंधार तालुक्यातील बारूळ येथील निम्न प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

या जलकुंभासाठी जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती जलजीवन मिशनचे शाखा अभियंता संजय स्वामी यांनी दिली. जळकोट तालुका हा डोंगरी असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. तालुक्यातील गावांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, म्हणून माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून- या योजनेला मंजुरी मिळवून घेतली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT