Ratnagiri अमोल कलये
महाराष्ट्र

लग्नासाठी आलेल्या जावयावर काळाचा घाला; रत्नागिरीत घडली दुर्देवी घटना

अनंत तेरवणकर असं मृत व्यक्तीचं नाव असून ते रत्नागिरीतील कोळंबे येथे लग्नासाठी गेले होते.

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरी : सध्या लग्नसराईचे दिवस असून मोठ्या प्रमाणात लग्न संमारंभ पार पडत आहेत. लग्न संमारंभासाठी अनेक लोक आपआपल्या नातेवाईकांच्या घरातील लग्न समारंभांना उपस्थिती लावण्यासाठी जात असतात. अशाच एका लग्न समारंभासाठी आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रत्नागिरीतील (Ratnagiri) कोळंबे गावात घडली आहे.

अनंत तेरवणकर असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. रत्नागिरीतील कोळंबे येथे लग्न होते. या लग्न समारंभासाठी अनंत तेरवणकर व त्यांचे कुटुंबीय गेले होते. लग्न समारंभ आटपून अनंत तेरवणकर कोळंबे येथे फिनोलेक्स कंपनीने बांधलेल्या धरणात अंघोळीसाठी गेले होते.

हे देखील पाहा -

मात्र, अंघोळ करत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले आहेत हे धरणाजवळ कपडे धुवायला गेलेल्या महिलांनी पाहिलं. दरम्यान, या महिलांनी गावात येऊन सदर घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांना दिली. गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेत अनंत तेरवणकर यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT