Sunil Tatkare Saam Tv
महाराष्ट्र

केंद्राचं बजेट हे घोर निराशा करणारं; अर्थसंकल्पावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

आकड्याचा खेळ करत केंद्र सरकारने कसे चांगले काम केले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - केंद्राच बजेट हे घोर निराशा करणारे आहे. आकड्याचा खेळ करीत स्वतःच कर्तृत्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तीन वर्षात राज्यात एक इंचही काम नाही अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पाबाबत खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे.

हे देखील पाह -

केंद्र आज अर्थसंकल्प जाहीर करणार असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हा अर्थसंकल्प घोर निराशा करणारा ठरला आहे. आकड्याचा खेळ करत केंद्र सरकारने कसे चांगले काम केले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. कुठलीही कर सवलत दिलेली नाही. नवीन योजना जाहीर करण्याचा कार्यक्रम केला आहे.

जाहीर केलेल्या योजनांबाबद फलश्रुती दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत तीन वर्षात एक इंचही रस्त्याचे काम राज्यात झालेले नाही आहे. ठोस देशाला प्रगती पथावर नेण्याबाबत कोणताही संकल्प अर्थसंकल्पात दिसत नाही. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत आधीही दिलेली आहे त्यात नवीन काहीच दिलेले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प घोर निराशा करणारा आहे. अशी प्रतिक्रिया रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teachers Summer Vacation: महत्त्वाची बातमी! शिक्षकांना यंदा उन्हाळ्याची सुट्टी नाहीच; कारण आलं समोर

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

देशावर मोठं संकट! होर्मुझ सामुद्रधुनीत 22 भारतीय जहाजं अडकली|VIDEO

Pimples And Dark Spots : तेलकट त्वचेवर लावा कोरफड आणि लिंबाचा रस, पिपंल्स आणि काळे डाग होतील कमी

Sara Ali Khan : मी सनातनी...; केदारनाथ-बद्रीनाथला जाण्यासाठी सारा अली खानला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, कोणी घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT