Ajit Pawar Beed
Ajit Pawar Beed Saam Tv
महाराष्ट्र

Beed: मराठवाडामुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाची राज्य सरकारने अनास्था दाखवली - अजित पवार

विनोद जिरे

बीड - आज मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. पण मराठवाडा आजही मागासलेपणाच्या जोखडात अडकलाय. काही क्षेत्रात भरारीही घेतली, आज अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा मुक्ती संग्रामाचा लढा आठवला जातोय. औरंगाबाद येथील कार्यक्रम केवळ 15 मिनिटांत आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हैदराबाद येथील कार्यक्रमाला गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

हे देखील पाहा -

हजारो मराठवाडा मुक्ति सैनिकांनी जीवाची बाजी लावत स्वतंत्र मिळवलं. त्याचं मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृत महोत्सवाची राज्य सरकारने अनास्था दाखवली आहे. हैदराबाद सारखा भव्य अमृत महोत्सवी कार्यक्रम औरंगाबादमध्ये घ्यायला पाहिजे होता अशी इच्छा अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली. ते बीडमध्ये बोलत होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीने 75 कोटी दिले होते. समिति नेमली होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नविन समिती सुद्धा नेमली नाही. सरकर येत असतात जात असतात, कुणीही ताम्र पट घेवून आले नाही. मराठवाड्याच्या गौरवशाली इतिहासा बद्दल मुख्यमंत्री यांनी अनास्था दाखवली हे खेदाचं आहे. मराठवाड्याच्या गौरवशाली लढ्याची माहिती सर्वांना कळाली पाहिजे. मराठवाड्याच्या विकसाकडे देखिल लाख दिल पाहिजे असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ratnagiri News : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, रत्नागिरीत 3 कोटींची रोकड जप्त.. | Marathi News

Sharad Pawar Health News: एक दिवसाच्या ब्रेकनंतर शरद पवार पुन्हा एकदा झंजावाती दौऱ्यासाठी सज्ज! मोठी Update समोर

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT