Rajesh Tope SaamTv
महाराष्ट्र

मृतांचे आकडे राज्य सरकारने लपवले नाहीत; टोपेंचा दावा

राज्यात ऑक्सिजनचे योग्य नियोजन झाल्याने एकाही रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचा दावा देखील राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण सोळुंके

जालना : दिल्लीत बर्ड फ्ल्यूचा पहिला बळी गेला असला तरी राज्यातील आरोग्य विभागाला बर्डफ्ल्यू संदर्भात काळजी घेण्यासाठी योग्य त्या सूचना केल्या जातील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील पहा -

मुंबई मधील लोकलबाबत बाबत बोलताना ते म्हणाले कि, मुंबईत लोकल सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्रीच निर्णय घेणार आहेत. राज्यात ऑक्सिजन वाटपाच योग्य नियोजन करण्यात आले होते. ऑक्सिजन गळतीची घटना देखील नाशिकमध्ये झाली हे खर आहे पण राज्यात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून तशा प्रकारची माहिती शपथपत्राच्या माध्यमातून कोर्टाला देण्यात आल्याचे देखील टोपे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकाही रुग्णाचा आकडा लपवला नसून खाजगी रुग्णालयांतील मृतांची आकडेवारी वेळेत अपलोड झाली नसल्याचं देखील टोपे म्हणाले. खाजगी हॉस्पिटलने मृतांची आकडेवारी दररोज अपलोड करण्यासाठी सूचना देणार असल्याचे देखील टोपे म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT