Solapur Water Issue:
Solapur Water Issue:  Saamtv
महाराष्ट्र

Solapur News: विहिरींनी तळ गाठला, बोअरवेल आटले.. सोलापुरात पाणी टंचाईच्या झळा; दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

विश्वभूषण लिमये

सोलापूर|ता. २२ एप्रिल २०२४

मे महिना सुरू होण्यास अद्दाप अवकाश आहे, त्याआधीच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसत असून अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर (Solapur) जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून अनेक गावात नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाला आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. तसेच गावातील विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेलही आटून गेल्यात त्यामुळे पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.

शासनाकडून आठ दिवसातून एकदा पाणी येत असल्याने टँकरद्वारे आडात पाणी साठवले जात आहे. हेच साठवलेले पाणी काढताना गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परंतु टँकरद्वारे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, दुषित पाण्यामुळे आजारी पडण्याचा धोका असल्याचे गावकरी सांगत आहेत. त्यामुळे शासनाने पाण्यासाठी उपाययोजना करावी, दुषित पाणीपुरवठा टाळावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यावर प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

Rajan Vichare News : ठाण्यात बोगस मतदान होणार, राजन विचारे यांचा दावा

Kalyan Election Voting LIVE : डोंबिवली पूर्वेत EVM मशीनमध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा

Lok Sabha 2024: भाजप सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटतंय; व्हिडिओ X पोस्ट करत राहुल गांधीचा गंभीर आरोप

Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांनी मतदानापूर्वी EMV मशीनला घातला फुलांचा हार; VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT