महायुती सरकारमधील तब्बल ८ मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचा सनसनाटी दावा सामना या दैनिकातून करण्यात आला. दैनिकात केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सरकारमध्ये खरोखरंच सर्व काही आलबेल आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सामनातील लेखात म्हटलंय की, लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात येईल, असा दावा देखील करण्यात आला आहे.
यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 'माध्यमांमधील बातम्यांवर विश्वास नाही. पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. पक्षाची जी इच्छा असेल, तीच इच्छा माझी इच्छा असेल', असं त्यांनी म्हटलं आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर आनंद होईल का? हा प्रश्न विचारले असता त्यांनी, 'मला देतील ती जबाबदारी पार पाडणार आहे', असंही नार्वेकर म्हणालेत.
'विधानसभा अध्यक्ष असेन किंवा मंत्री, शेवटी जनतेसाठीच काम करायचं आहे', असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. अधिवेशनामध्ये आतापर्यंत १५२ लक्षवेधी मांडण्यात आल्या आहेत. मी माझ्या पदावर चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. इतर जबाबदारी मिळाली तर, ती सुद्धा योग्य पार पाडू. मी माझ्या कामाबाबतीत संतुष्ट आहे. जेव्हा केव्हा मंत्रिपदाची माळ पडेल. त्यावेळी बघू, असंही यावेळी नार्वेकर म्हणाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.