मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या जवळपास ५० समर्थक आमदारांसह बंडखोरी करुन गुवाहाटीत तळ ठोकून बसले आहेत. महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. अशातच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh bangar) यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील,त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य बांगर यांनी केलं आहे.
संतोष बांगर यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेला (Shivsena) भगदाड पाडून बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांच्या बायका सोडून जातील. त्यांच्या मुलांना कोणीही बायका देणार नाही, असं वादग्रस्त विधान बांगर यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या आदेशानंतर मुंबईमधून मतदारसंघात परतलेल्या संतोष बांगर यांनी गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांना थेट संपर्क करण्यासाठी संवाद दौरा सुरू केला आहे. वसमत शहरात संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार संतोष बांगर बोलत होते.
Edited by - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.