नैवैद्य
नैवैद्य  
महाराष्ट्र

अनोखी परंपरा..एकाच घरातील ५२ चुलीवरचा नैवैद्य लाडक्या बाप्पाला!

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : नवसाला पावणारा अशी ओळख असलेला सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील नेरुर माड्याचीवाडी येथील गावडे कुटूबांचा ५२ चुलीचा गणपती संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. (shindhudurg-news-gavade-family-Unique-tradition-ganesh-festival-52-stoves-in-the-same-house)

शाडू मातीच्या २१ गोळ्यांपासुन गणपती घरी मूर्तिकार येऊन बनवतो, ही प्रथा गेले अनेक वर्षांपासून गावडे घराण्यामध्ये चालत आलेले पध्दत आहे. दरवर्षी एकाच पद्धतीचा गणपतीचा पेहराव असतो. फेट्याचा गणपती म्हणून ओळख आहे. त्यात कोणत्याही पध्दतीचा बदल केला जात नाही. कोकणात घरोघरी गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात. मात्र गावडे कुटुंबिय एकत्र येत एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करतात. ३०० ते ३५० कुटुंब एकत्र येतात. गावडे कुटुंबिय पाच दिवस एकत्र येत गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात

५२ चुलीवर शिजते अन्‍न

५२ चुलीवर विविध प्रकारचे पदार्थ बनवून गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. सर्व महिला एकत्र येत या ५२ चुलीवर जेवण बनवले जाते. रात्री गणपती समोर फुगड्या, भजन करून रात्र जागवली जाते. गेले अनेक वर्षांपासून जी परंपरा चालत आलेली आहे. तीच परंपरा एकत्रितपणे आम्ही चालू ठेवू असे गावडे कुटुंबिय सांगतात.

गावडे कुंटुंबियांचा एकत्रितपणा

कोकणात एकत्रितपणा कुटुंब पद्धत फार कमी पाहायला मिळते. मात्र दुर्मिळ होत चाललेली एकत्रित कुटुंब पद्धत अनुभवायची असेल तर कुडाळमधील नेरुर येथील गावडे कुटुंबिय हे एक उदाहरण आहे. गेले कित्येक वर्षे एकत्रित येऊन एकाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

SCROLL FOR NEXT