सातारा : सुर्ली (ता. कोरेगाव) येथे काल रात्री कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच (Death) मृत्यू झाला. तिघे मृत आर्वी (ता. कोरेगाव) येथील आहेत. (Satara Accident News)
आर्वी (ता .कोरेगाव) येथील तुकाराम आबाजी माने (वय 65 ), तानाजी आनंद माने (वय 62), सुभाष गणपत माने (वय 60) हे तिघेजण साताराहून (Satara) आर्वीकडे येत असताना सुर्ली गावानजीक असलेल्या वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये (Accident) तिघेजण गंभीर जखमी झाली होते.
रस्त्यातच मृत्यू
जखमी तिघांना वाठार किरोली येथील युवकांनी सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रस्त्यातच या तिघांचा दुर्दैवी अंत झाला. आर्वी येथील तीन जणांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.