Sakal Vidhan Sabha Election Survey News Saam tv
महाराष्ट्र

Sakal Survey 2024: मविआचा सर्वाधिक फायदा कोणाला, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन ठाकरेंचं नुकसान? सर्वेक्षणातून समोर आली माहिती

Sakal Vidhan Sabha Election Survey News: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर साम आणि सकाळने सर्वेसक्षण के आहे. यामध्ये या सर्वेक्षणातून महाराष्ट्रतल्या जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Satish Kengar

महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा कोणाला झाला, हे लोकसभा निवडणुकीत दिसून आलं आहे. आता तोच कल आता साम आणि सकाळच्या सर्वेक्षणातून समोर येतोय. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर साम आणि सकाळने सर्वेसक्षण केलं आहे. यामध्ये या सर्वेक्षणातून महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कसं करण्यात आलं सर्वेक्षण?

सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. राज्यभरातून 288 विधानसभा मतदारसंघातून 84529 मतदारांशी संवाद साधण्यात आला. त्यासाठी सकाळचे दोन हजारांवर सहकारी सहभागी झाले होते. मतदारांची निवड करतांना 48 लोकसभा मतदारसंघांना 288 विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले. पुढे शहरी आणि ग्रामीण भागांची प्रभाग आणि जिल्हा परिषद गट अशी विभागणी करण्यात आली. भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले आहेत. यासाठी स्तरीय यादृच्छिक नमुना संशोधन पद्धत वापरण्यात आली.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा हा काँग्रेसला होऊ शकतो, असा कल साम आणि सकाळच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालं आहे, असा कलही या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

महाविकास आघाडीचा सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला?

या सर्वेक्षणातून प्रश्न विचारण्यात आला की, महाविकास आघाडीचा सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला? यावर उत्तर देताना 37.1 लोकांनी काँग्रेसला झाला असल्याचं म्हटलं आहे. तर 18.5 टक्के लोकांनी शरद पवार आणि 13.6 टक्के लोकांनी ठाकरे गटाला झाल्याचं म्हटलं आहे. तसेच 30.8 लोकांनी सर्व घटक पक्षांना समान फायदा झाल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानं उद्धव ठाकरेंचं नुकसान झालं का?

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानं उद्धव ठाकरेंचं नुकसान झालं का? असाही प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला. यावर उत्तर देताना 31.3 टक्के ओकांनी हो, असं उत्तर दिलं आहे. तर 43.3 लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे आणि सांगता येत नाही असं 25.4 टक्के लोकांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT