Mla Rajesh Tope saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या पाण्यासाठी न्यायालयात जाणार : राजेश टाेपे

अद्याप जायकवाडीसाठी पाणी साेडले न गेल्याने आमदार राजेश टाेपे संतापलेत.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : मराठवाड्याला पाणी न सोडणारे झारीतले शुक्राचारी कोण आहेत असा सवाल आज (शनिवार) आमदार राजेश टाेपे (mla rajesh tope reaction on jayakwadi dam water issue) यांनी उपस्थित केला. दरम्यान या प्रश्नी न्यायालयाचे दरवाजे ठाेठावण्याचा इशारा आमदार टाेपे यांनी दिला आहे. (Maharashtra News)

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam Water Issue) नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. यादोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून ८.६० टीएमसी इतके पाणी जायकवाडीली साेडले जाणार आहे. या निर्णयाच्या विराेधात नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतक-यांसह लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आहे. त्यामुळे अद्याप जायकवाडीसाठी पाणी साेडलेले गेले नाही.

त्यामुळे आमदार राजेश टाेपे हे आज संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले यंदा मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्यानं पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. त्यानुसार मराठवाड्यातल्या जायकवाडीत हक्काचं 8.603 टीएमसी पाणी सोडणं गरजेचं आहे.

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं आदेश काढूनही नऊ दिवस झाले तरीही पाणी का सोडलं गेले नाही असा सवाल टाेपे यांनी केला आहे. पाणी सोडा अन्यथा संघर्षय आंदोलन छेडले जाईल असा इशारा टोपे यांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले ज्यांनी कायदाची अंमलबजावणी केलेली नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दरम्यान टाेेपे यांनी जायकवाडीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा उभारण्याचा मनाेदय व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

SCROLL FOR NEXT