पूरग्रस्तांना मदतीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आवाहन SaamTv
महाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदतीचे राज ठाकरेंचे आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाराष्ट्र सैनिकांना 'कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करा' असे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसाने कोकणासह Konkan पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांच्या समस्यांच्या जाणिवेतून असंख्य महाराष्ट्र सैनिकांचे मदतीचे हात पुढे आले आहेत.

हे देखील पहा -

मनसे नेते बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी भायखळा विधानसभा तसेच एकलव्य फाउंडेशन अध्यक्षा सृष्टी नांदगावकर यांच्या वतीने सहाय्यता सामुग्री व जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागातील लोकांना मदत स्वरूपात पाठवण्यात येणार आहेत.

पूरग्रस्तांना सहाय्यता सामुग्रीमध्ये पॅक केलेले अन्न, प्रथमोपचार किट, ब्लँकेट, कपडे, खाऊ, पाण्याच्या बाटल्या व भांडी अश्या स्वरूपाच्या जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत. पूरग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, त्यामुळे जमेल तेवढी मदत करा असे आवाहन मनसे MNS नेते Leader बाळा नांदगावकर केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

SCROLL FOR NEXT