राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, अनेक ठिकाणी पाणी साचले.
हिंगोलीत महापुरात शेतकरी व पर्यटकाचा मृत्यू.
जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहील असा इशारा दिला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. सलग तीन ते चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुण्यातील हिंगोलीत आलेल्या महापुरामुळे आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे. यामध्ये एका शेतकऱ्यासह धबधब्यावर पोहण्यासाठी आलेल्या एका पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेनंतर प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी धोंडीराम घोगरे काम करत असताना पाण्याच्या प्रचंड वेगात बुडाले. तर धबधब्यावर पोहण्यासाठी आलेले गोविंद लोंढे सेल्फी काढत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले असल्याचं समोर आले आहे. दोन्ही घटनांमुळे गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने लोकांना सावध केले आहे.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक ठिकाणी प्रवास टाळावा, नद्या-नाल्यांजवळ जाणे टाळावे, तसेच पर्यटकांनी पावसाळ्यात धबधबे, घाट परिसर आणि नदीकाठावर जाताना विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गरज असेल तर घराबाहेर पडा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.