Sanjay Raut News SAAM TV
महाराष्ट्र

Pulwama Attack : मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा; पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिकांच्या गभीर आरोपानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Latest Press Conference : मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा, सत्यपाल मलिकांच्या गभीर आरोपानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

Satish Kengar

Sanjay Raut Latest Press Conference : मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. यावरच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले आहेत की, आताच्या सत्ताधाऱ्यांची जवानांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याच राजकारण करावं अशी काही योजना होती का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच सत्यपाल मलिक यांनी स्फोटक सत्य आणलं आहे, असं ते म्हणाले आहेत.

पुलवामा हल्ल्यावरून काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, ''पुलवामा हल्ल्यात काहीतरी गडबड आणि घोटाळा आहे, ही गोष्ट आधीच देशाला माहित होती. यामध्ये तेव्हाचे सत्ताधारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात होते. ते निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील.''  (Latest Marathi News)

राऊत म्हणाले, ''हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला आहे की, पुलवामात 150 किलो आरडीएक्स पोहोचाल कसं? पुलवामाच्या रस्त्याने कधीही सुरक्षाकर्मी कधीही प्रवास करत नाही. त्यांना एअर फोर्स किंवा सरकारने विमान का दिलं नाही? त्यांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याच राजकारण करावं अशी काही योजना होती का? हे प्रश्न तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाने विचारले. पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हटलं गेलं, तसेच ते पाकिस्तानची भाषा बोलतायत असं म्हणत गुप्प करण्यात आलं.''

सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे: राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, ''आज त्यांनीच नेमलेले तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तेच स्फोटक सत्य समोर आणलं आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. तसेच जे मंत्री जबाबदार आहे, त्यांचं कोर्टमार्शल व्हायला पाहिजे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT