Yavtmal News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Yavtmal News : यवतमाळ जिल्ह्यात एका ३७ वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून पती जखमी झाला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Alisha Khedekar

  • अंजी नाईक गावात विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

  • तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार राजकीय कटाचा संशय व्यक्त केला आहे.

  • सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल; पोलिस तपास सुरू.

  • गावात तणावाची स्थिती असून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राजकारणासाठी लोक क्रौर्याची परिसीमा देखील पार करताना दिसत आहेत. अशातच परंपरागत राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी चक्क विरोधकाच्या घराभोवती तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये ३७ वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे, तर तिचा पती थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. सविता मनेश पवार असे मृत महिलेचे नाव आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता पवार रात्री अडीचच्या सुमारास बाथरूमसाठी उठल्या. घराबाहेर असलेल्या बाथरूमकडे जाण्यासाठी दरवाजा उघडताच त्यांचा अचानक तोल जाऊन त्या जमिनीवर कोसळल्या. त्याचवेळी त्यांच्या पती मनेश यांच्या हाताला आणि पायाला विजेचा झटका बसल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राजू पवार, राजू राठोड आणि इंदल पवार धावून आले आणि दोघांनाही आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सविता यांना मृत घोषित केले.

या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत मनेश पवार यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ग्रामपंचायत निवडणुकीतील वैमनस्यातून इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजू जाधव आणि चेतन चव्हाण या सहा जणांनी त्यांच्या घराच्या बाहेर विजेचा प्रवाह असलेला तार लावला होता. याच तारेला स्पर्श झाल्यामुळे सविता यांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. यापूर्वीही पवार कुटुंब आणि संशयित आरोपींमध्ये वाद झाले असून त्याबाबतचे गुन्हे आधीच नोंदवले गेले होते, अशी माहितीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावाची स्थिती पाहता दंगल नियंत्रण पथकही रवाना करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना गावात राजकारणाने घेतलेले धोकादायक वळण स्पष्ट करते आणि स्थानिक राजकारणाचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो, हे अधोरेखित करते. दरम्यान या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

अंजी नाईक गावात नेमकी काय घटना घडली?

एका महिलेला घराबाहेर विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असून तिच्या पतीला देखील झटका बसला आहे.

मृत महिलेचे नाव काय आहे आणि ती कशी मरण पावली?

सविता मनेश पवार (वय ३७) यांचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.

ही घटना अपघात होती की घातपात?

पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, राजकीय वैमनस्यातून घातपात झाला असल्याचा संशय आहे. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर काय कारवाई झाली?

पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गावात तणाव निर्माण झाल्याने अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबईत पावसाचा जोर कायम, ठाणे - नवी मुंबईतील शाळांना २ दिवस सुट्टी जाहीर

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT