Ramdas Kadam-Bhaskar Jadhav Saam TV
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : रामदास कदम म्हणजे तात्या विंचू;भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Thackeray Group Rally: रामदास कदम फडतूस, भंपक माणूस आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Political News : रत्नागिरीतील खेड येथे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा तात्या विंचू अस उल्लेख केला आहे.

प्रत्येकाच्या घरात जाऊन बोलतोय, मला उद्धव साहेबांनी संपवलं. खरं सांगायचं तर उद्धव साहेबांनी काय बांडगुळं पाळली देवालाच माहिती आहे. आदित्य ठाकरेंनी माझ्या बाजूला बसून काम करुन घेतली आणि माझं खातं पळवलं असं रामदास कदम म्हणत आहेत. पण त्यांना साधं पर्यावरण तरी म्हणता येतं का? रामदास कदम झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू आहेत, अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे. (Political News)

कोकणातील नैसर्गिक संकटात रामदास कदम फिरले का? कोरोना संकटात एकाही गावात गेले नाही. पाच वर्ष मंत्री होता, मतदारसंघात काहीही काम केलं नाही. केवळ मुलाकरिता दापोलीत निधी दिला.

एक रुपयाचं काम यांनी केलेलं नाही. आपला पोरगा निवडून यावा म्हणून पैसे आपल्या मतदारसंघात आणले. याला जर मातीत घालायचं आणायचं असेल तर संजय कदमला आपल्याकडे आणावं लागेल. आपण संजय कदम यांना आणलं आहे. रामदास कदम फडतूस, भंपक माणूस आहे. तुझी बोलती शिमग्याच्या दिवशी बंद करायची आहे, असा इशाराही भास्कर जाधवांनी रामदास कदमांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT