भरत नागणे
पंढरपूर येथील वारकरी (Warkari) संप्रदायामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्थल संन्याशी वयोवृध्द स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या मृत्यू पूर्वीच त्यांच्या भक्तांनी स्थल समाधीसाठी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात जागा मिळावी अशी लेखी मागणी सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील सुधाकर मुरलीधर पुंड यांनी 20 वर्षांपूर्वी पंढरपुरात येवून स्थल संन्यास घेतला आहे. स्थल संन्यास घेतल्यानंतर आयुष्याच्या अखेरपर्यंत पंढरपूर सोडले जात नाही, अशी त्यामागची परंपरा सांगितले जाते. मुरलीधर पुंड यांनी बाल योगी महाराजांकडून स्थल संन्याशाची दिक्षा घेतली आहे. तेव्हापासून सुधाकर पुंड महाराज पंढरपूर (Pandharpur) येथील भागवत धर्म सेवा मंडळाच्या बालयोगी मठात राहायला आहेत.
तेव्हापासून त्यांचे स्वामी माधवानंद सरस्वती हे नाव रूढ झाले आहे. माधवानंद सरस्वती महाराज यांचे 85 वर्षे वय आहे. ते सतत आजारी असतात. वार्धक्यामुळे त्यांना कधीही देव अज्ञा होऊ शकते. स्थल संन्यास घेतल्याने मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. त्याऐवजी स्थल समाधी किंवा जल समाधी दिली जाते.
ऐनवेळी स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या स्थल समाधीचा प्रश्न निर्माण होऊनये यासाठी त्यांच्या भक्तांनी त्यांच्या मृत्यू पूर्वीच चंद्रभागा वाळवंटात स्थल समाधीसाठी जागा मिळावी अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीवर जिल्ह्यधिकारी काय निर्णय घेतात याकडेच पंढरपुरातील वारकरी संप्रदायाचे व त्यांच्या भक्तांचे लक्ष लागले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.