Vagitable Price Saam tv
महाराष्ट्र

Vegetable Price : कोथिंबीर २००, मिरची १२० रुपये किलो; आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले

Parbhani News : यंदा पाण्याची टंचाई असल्याने भाजीपाल्याची जास्त लागवड करण्यात आलेली नव्हती. शिवाय उन्हामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी होत असते

राजेश काटकर

परभणी : गत काही दिवसांपासून भाज्यांची आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. मिरची, शेवगा, फुलकोबी, गवार १२० रुपये किलोवर पोहोचली. परिणामी, ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत असल्याची स्थिती आठवडे बाजारात दिसून येत आहे.

यंदा पाण्याची टंचाई असल्याने भाजीपाल्याची जास्त लागवड करण्यात आलेली नव्हती. शिवाय उन्हामुळे बाजारात भाज्यांची (vegetable) आवक कमी होत असते. यंदा हीच परिस्थिती असल्याने बाजारात भाज्यांची आवक मंदावली आहे. शिवाय यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना (Farmer) भाजीपाल्याचे उत्पादन घेता आले नाही. परिणामी, बाजारात भाज्यांचे दर कडाडल्याची स्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यासह तालुक्यातील आठवडी बाजारात काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे.

मिरची, शेवगा, फुलकोबी, गवार, शेपू, मेथी, कोथिंबीर या भाज्यांनी शंभरी पार केली आहे. तर पालक, कारले, टोमॅटो, दोडके, भेंडी, बटाटेही भाव खात आहेत. तर कोथंबीरीचे भाव पुन्हा एकदा दोनशे रुपये किलोवर पोहचले आहेत. परिणामी, गृहिणींना भाज्या खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT