पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी लढा सुरु असून ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत; त्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ मिळेल. परंतु सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणे अशक्य असल्याचे मोठं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पंढरपुरात केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढाई उभारली आहे. यासाठी बेमुदत उपोषण देखील केले आहे. तर आता २९ ऑगस्टला मुंबई येथे पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे. अर्थात आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नसल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तसेच आपण शिर्डीला जावून चुक केली. माढ्यातून निवडणूक लवढली असती तर तिसऱ्यांदा लोकसभेत गेलो असतो अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.
ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये अशी भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आरपीआयचा पाठिंबा आहे. जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मराठा बांधवांनी आरक्षणाची मागणी केली आहे. सरकारने यापूर्वीच मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरु आहे. मात्र ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये अशी राज्य सरकारची भूमिका आहे.
मुख्यमंत्र्यांकडे बैठकीसाठी करणार मागणी
आंदोलन सुरु होण्यापूर्वी यातून मार्ग काढावा व यासंदर्भात एक बैठक देखील घ्यावी; यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मी मागणी करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे प्रयत्नशील आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीस समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतल्याचेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.