पंढरपूर : कर्जाला कंटाळून राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. मायबाप सरकाराला शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहिर करण्याची विघ्नहर्त्याने सुबुद्धी द्यावी; अशी मागणी करणारे फलक जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी शेतात बॅनर लावून करण्यात आली आहे. यामुळे परिसरात चर्चा रंगू लागल्या आहेत.
पंढरपूरच्या करमाळा येथे लावण्यात आलेल्या शेतकरी कर्ज माफी बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सरकारने निवडणूकी पूर्वी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्षानंतर कर्ज माफी झाली नाही. अर्थात सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. तर शेतकरी वर्गाला देखील सरकारकडून कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा आहे. त्या अनुषन्गाने जनशक्ती शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे.
गणरायाच्या आगमनानिमित्त कर्जमाफीची आठवण
आज गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने सरकारला शेतकरी कर्ज माफीची आठवण म्हणून जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी करमाळा तालुक्यातील केम गावात बॅनर लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफी कधी करणार असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या बॅनरवर शेतकऱ्यांनी गळफास घेतल्याचे प्रतिकात्मक फोटोसह उपमुख्यमंत्री अजित पवार, अतुल खूपसे व जनशक्ती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो छापण्यात आले आहेत.
अजित पवार यांना प्रश्न
शेतकरी कर्जमाफी मागणाऱ्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न देखील करण्यात आले आहेत. यात दादा सांगा योग्य वेळ कधी येणार? योग्य वेळ येण्यासाठी अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला लागणार?, प्रिय उपमुख्यमंत्री दादा योग्य वेळेसाठी लागणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्यांचा कोठा आम्हाला कळवा. आमच्या कर्जमाफीसाठी आम्ही सामूहिक आत्महत्या करण्यास तयार आहोत; असे अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.