Palghar News
Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar News : भीषण पाणी टंचाईत कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया; कोकण पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

रुपेश पाटील

पालघर : राज्यात सध्या भीषण पाणी टंचाई पहायला मिळत आहे. पालघरच्या ग्रामीण भागातील नागरिकांना (Water Scarcity) हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. तर याच पालघर (Palghar) जिल्ह्यात दुसऱ्या बाजूला मात्र कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (Maharashtra News)

कोकण (Kokan) पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत तलासरीत असलेल्या कुरंझे डॅममधून कालव्यांमार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र या कालव्यांची आणि कालव्यांमध्ये असलेल्या लोखंडी गेटची दयनीय अवस्था झाली असल्याने या कालव्यांमधून लाखो लिटर पाणी वाया जाऊन त्याची नासाडी होत असल्याच समोर आल आहे. हे पाणी थेट नद्यांमध्ये जाऊन मिळत असल्याने या पाण्याचा कोणताही फायदा येथील शेतकऱ्यांना (Farmer) होताना दिसत नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या पाण्याच्या नासाडीकडे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात एका बाजूला धरणांमध्ये कमी पाणीसाठा असताना दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीने पाणी वाया जात आहे. या सगळ्या परिस्थितीकडे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ दुर्लक्ष का करतय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा

Gauri Nalawade: माळरानी यावं गुलाबाचं फूल, गौरीच्या रुपाची पडली भूल!

Navi Mumbai Crime News: कंत्राटदाराने केली सहकाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Relationship Tips : डेट करणाऱ्या मुलीशी चॅटवर बोलताना 'ही' काळजी घ्या; प्रेमाचं नातं आणखी बहरेल

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ट्राय करा 'हे' Home Remedies

SCROLL FOR NEXT