भारतानं पाकिस्तानला 48 तासांत गुडघ्यावर आणण्याची रणनिती आखली होती. मात्र पाकिस्ताननं अवघ्या 8 तासात भारतापुढे गुडघे टेकले. सीडीएस जनरल अनिल चौहान ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताच्या युद्धकौशल्याची एक चुणूक होती.
आपल्या तंत्रज्ञानाची ताकदच या निमित्तानं जगाला दाखवली. पाकिस्तानला ४८ तासात नमवण्याची रणनीती आखली असताना भारतीय सैन्यान ही कामगिरी अवघ्या आठ तासात पार पाडली. पुण्यातल्या एका कार्यक्रमात खुद्द सीडीएस चौहान यांनीच हे वक्तव्य केलं.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. अवघ्या 25 मिनिटांत भारतानं पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं. याआधी सीडीएस अनिल चौहान यांनी पाकनं भारताची विमानं पाडल्याची कबुली देत. चुका सुधारून पुढे जायचं आणि दहशतवाद्यांचा खात्मा करायचं असा निर्धार व्यक्त केला होता.
ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या युद्धनीतीची ताकद आणि दहशतवादाविरुद्धच्या कठोर भूमिका जगानं पाहिली आहे. आता भारत कोणच्याही पोकळ धमक्यांना सहन करणार नाही, हे निश्चित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.