अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीमधील कामगारांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिला आणि पुरूषांना विषबाधा झाली असून, दुषित पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे दूषित पाण्यामुळे बुलढाण्यात टक्कल व्हायरसने हाहाकार माजवला असताना, दुसरीकडे अमरावतीत विषाबाधेमुळे लोकांना याचा नाहक त्रास होऊ लागल्याने, नागरीकांनी चिंता व्यक्त केली आहे.
नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीमधील कामगारांना विषबाधेचा त्रास झाला आहे. हा त्रास दूषित पाण्यामुळे कामगारांना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जवळपास १०० हुन अधिक महिला आणि पुरूषांना विषबाधा झाली असून, महिला आणि पुरूष कामगारांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंपनीतील कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्यानंतर अचानक उलटीचा त्रास होऊ लागला. पोटदुखी आणि मळमळी देखील जाणवू लागली. त्यामुळे त्यांना तातडीने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीत हा प्रकार दूषित पाण्यामुळे झाला असून, कंपनीमधील पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय कामगार आणि नागरीकांनी व्यक्त केला आहे.
कामगारांना विषबाधेचा त्रास जाणवू लागल्यानंतर काहींना मळमळ, तर काहींना उलटी देखील झाली होती. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर मनसे शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी तातडीने धाव घेत कामगारांना खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापकांना फटकारले. कंपनीच्या हलगर्जीपणा आणि दूषित पाण्यामुळे कामगारांना विषबाधेचा त्रास झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कंपनी व्यवस्थापकांना मनसे शहराध्यक्षांनी झापले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.