Bombay High court saam tv
महाराष्ट्र

Court News : सूनेला टीव्ही बघू न देणे, शेजाऱ्यांशी बोलू न देणे क्रूरता नव्हे; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

High Court Latest News Update : महिलेला टीव्ही बघू न देणे किंवा टोमणे मारणे, एकटीला मंदिरात जाण्यास परवानगी न देणे ही क्रूरता होऊ शकत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना केली.

Nandkumar Joshi

Bombay High Court Latest News : सूनेला टीव्ही बघू न देणे, एकटीला मंदिरात जाऊ न देणे, जमिनीवर झोपण्यासाठी जबरदस्ती करणे ही मानसिक आणि शारीरिक क्रूरता नव्हे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका प्रकरणात केली.

मृत पत्नीशी क्रूरतेने वागल्याच्या आरोपातून तिचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांची मुक्तता करतानाच, मुंबई उच्च न्यायालयाने २० वर्षांपूर्वीचा निर्णय रद्दबातल ठरवला. महिलेला टीव्ही बघून न देणे, एकटी मंदिरात जाण्यास रोखणे, शेजाऱ्यांशी बोलू देण्यास मनाई करणे आणि जमिनीवर झोपण्यास जबरदस्ती ही क्रूरता म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या कृती अधिक गंभीर प्रकरणात येत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

सासरच्या मंडळींनी आमच्या मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. मुलीला टीव्ही पाहण्यापासून रोखले. एकटीला मंदिरात जाण्यास मनाई केली. जमिनीवर झोपण्यास भाग पाडले. रात्री-बेरात्री पाणी भरायला जाण्यास सांगितले. अशा प्रकारे त्रास दिल्याने आमच्या मुलीने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.

न्यायालयाकडून निर्णय रद्द

पती आणि त्याच्या कुटुंबावर झालेले हे सर्व आरोप सामान्य कौटुंबिक घटना होत्या. त्या अत्यंत गंभीर प्रकारात मानता येत नाहीत. टीव्ही पाहू न देणे किंवा जमिनीवर झोपणे या गोष्टींना क्रूरतेचे स्वरुप देण्यात आले. पण त्या शारीरिक आणि मानसिक छळ म्हणून मानल्या जाऊ शकत नाहीत. क्रूरता या शब्दाचा अर्थ केवळ मानसिक आणि शारीरिक छळ होतो असं नाही, परिस्थितीनुरूप त्याचा अर्थ बदलू शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने काय निर्णय दिला?

आरोपी कुटुंबीय हे महिलेला अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक देत होते किंवा तिचा क्रूरपणे मानसिक आणि शारीरिक छळ करत होते, असे सिद्ध करणारे ठोस पुरावे तिच्या कुटुंबीयांकडे नव्हते. यावरून महिलेच्या आत्महत्येमागे तिच्या सासरच्या मंडळींचा थेट हात असल्याचे सिद्ध होत नाही, असे नमूद करतानाच न्यायालयाने २० वर्षे जुना निकाल रद्दबातल ठरवून आरोपी कुटुंबीयांना निर्दोष ठरवले.

न्यायालय काय म्हणाले?

या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने नमूद केले की, 'केवळ जमिनीवर झोपणे क्रूरता मानता येऊ शकत नाही. आरोपांमध्ये अत्यंत गंभीर असे काही नाही आणि या सामान्य कौटुंबिक घटना आहेत. त्या कलम 498A अंतर्गत क्रूरतेचं प्रकरण मानले जाऊ शकत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT