Sangli Crime News विजय पाटील
महाराष्ट्र

म्हैसाळमधील त्या ९ जणांची आत्महत्या नव्हे हत्या; पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. म्हैसाळमधील उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील ९ लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याचं सांगण्यात आलं होत.

मात्र, या ९ जणांनी आत्महत्या केली नव्हती तर त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या हत्याकांड प्रकरणी दोन व्यक्तीना अटक देखील करण्यात आली आहे. म्हैसाळमधील त्या घरातील लोकांनी आत्महत्या केली नव्हती तर त्या नऊ लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचं पोलिस (Police) तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहीती सांगली (Sangli) पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

या हत्याकांडाप्रकरणी आब्बास महमंदअली बागवान वय ४८ वर्षे रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापुर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे वय ३० वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणा नाका, सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार या ९ जणांची आत्महत्या नसून हत्याकांडच असल्याचे उघडकीस आले आहे. यामागे गुप्तधनाच्या कारण असून या प्रकरणी एका मंत्रिकासह एकास पोलिसानी अटक केली आहे. या घटनेत नव्याने अटक केलेले दोघे संशयित आरोपी हे मयताच्या घरी येत होते. यावेळी आरोपी आणि मयतामध्ये गुप्तधनाच्या चर्चा होत होत्या.

त्यामुळे गुप्तधनाच्या विषयावरूनच यातून ९ जणांच्या हत्या झाल्या. यामध्ये दोन व्यक्तीनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्याना मारण्यात आले असून या प्रकरणी दोघेजण अटकेत असून या दोन जनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काय आहे प्रकरण -

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाला हादरवून सोडणारी घटना मिरज (Miraj) तालुक्यातील म्हैसाळ या ठिकाणी घडली होती. एकाच कुटुंबातील तब्बल ९ जणांच्या परिवाराने एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

हे सर्वजण उच्चशिक्षित होते, पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली होती. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन हे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता.

शिवाय ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली की तो घातपात याबाबत अनेक तर्कवितर्क देखील व्यक्त करण्यात येत होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झाले होते. या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. त्याचबरोबर गुप्तधनाच्या लालसेपोटी कुटुंबाने पैसे एक मांत्रिकावर लुटवले होते. त्यातून कंगाल होऊन कर्ज झालं असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र आता पोलिसांच्या तपासामध्ये त्या कुटुंबाने आत्महत्या नव्हे तर त्यांची हत्या केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT