Jayant Patil News Saam TV
महाराष्ट्र

Jayant Patil News : शिंदे-फडणवीस सरकारला फक्त उद्योगपतींची काळजी; जयंत पाटलांची खोचक टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज पंढरपुरात आले होते.

भारत नागणे

Jayant Patil News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही तर त्यांना उद्योगपतींची जास्त काळजी आहे. त्यामुळेच अर्थकारणातील अंतर वाढू लागले आहे. उद्योगपती अधिक श्रीमंत होत आहेत तर सर्वसामान्य जनता गरीब होत चालली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांनी वाडीकुरीली येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळ्याव्याला हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे सर्वेक्षण होतं आणि ते लोकसभेत मांडले जाते. मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तर त्यात असं दिसतं आहे की भारतातील शेतकऱ्याचं उत्पन्न दीड ते दोन टक्यांनी घटल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ठराविक लोक श्रीमंत होत आहेत. श्रीमंती आणि गरीबीमध्ये जमीन आसमानचा फरक पडू लागला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, की राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही तर त्यांना उद्योगपतींची जास्त काळजी आहे. त्यामुळेच अर्थकारणातील अंतर वाढू लागले आहे. उद्योगपती अधिक श्रीमंत होत आहेत तर सर्वसामान्य जनता गरीब होत चालली आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT