Saptasrhungi Gad Saam tv
महाराष्ट्र

Saptasrhungi Gad: सप्तशृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; गडावरील रोपवे दोन दिवसांसाठी बंद

Nashik News : सप्तशृंगीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; गडावरील रोपवे दोन दिवसांसाठी बंद

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : साडेतीन शक्तीपीठ पैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांच्या सोयीसाठी रोपवे (Nashik) तयार करण्यात आलेला आहे. मंदिरात जाण्यासाठी असलेला हा फ्युनिक्युलर रोपवे दोन दिवस बंद राहणार आहे. यामुळे (Saptashrungi Gad) भाविकांना दोन दिवस पायऱ्या चढून गडावर देवीच्या दर्शनाला जावे लागणार आहे. (Maharashtra News)

नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होत असते. या गडावर येणाऱ्या भाविकांसाठी २०१८ मध्ये फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या फ्युनिक्युलर रोपवेमुळे भाविकांना लवकर दर्शनासाठी गडावर जात येणे शक्य होत असते. सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येणारे वृद्ध, दिव्यांग, महिला, रुग्ण भाविक, तसेच लहान मुलांना सहजपणे दर्शन घेण्याची सशुल्क सुविधा प्राप्त झाली आहे. 

दोन दिवस राहणार बंद 

मंदिरात जलद जाता- येता यावे, या दृष्टीने भाविक रोपवेचा वापर अधिक प्रमाणात करत असतात. दरम्यान, १३ व १४ सप्टेंबर असे दोन दिवस रोपवेच्या पूर्व नियोजित तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी रोपवे बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन दिवसात भाविकांना पायऱ्यानीच वर चढावे लागणार आहे. मात्र शुक्रवार (१५ सप्टेंबर) रोपवेची सेवा पूर्ववत केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghee Use For Hair: केसांना तूप लावण्याचे अद्भुत फायदे जाणून घ्या

Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

SCROLL FOR NEXT