Onion Auction Saam TV
महाराष्ट्र

Nashik Onion Auction: नाशिकमध्ये कांदा कोंडी कायम; ८ दिवसानंतर विंचुर उपबाजार समितीत लिलाव सुरू

Nashik Onion Market Strike: जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून संप पुकारला आहे,

Gangappa Pujari

अजय सोनवणे, प्रतिनिधी

Nashik Onion Market:

नाशिक जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क मागे घ्यावे आणि नाफेडचा कांदा घाऊक बाजारात विक्री करू नये, या मागणीसाठी 20 सप्टेंबरपासून नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने लिलाव बंदीचा निर्णय घेतला आहे. आज सातव्या दिवशी विंचूर उपबाजारात काही व्यापाऱ्यांच्या मदतीने लिलाव सुरू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प झाल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

पियुष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत 29 तारखेला व्यापाऱ्यांच्या मागण्यांसाठी बैठक होणार आहे. या संपामुळे शेतकऱ्यांची होणारी कोंडी लक्षात घेता लासलगावच्या विंचूर येथील उपबजार समितीने गणेश विसर्जनाच्या मुहूर्तावर कांदा लिलावला सुरुवात केली आहे.

दरम्यान, कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी मोठ्या संख्येने कांदा विक्रीला घेऊन आले होते. कांद्याला जास्तीत जास्त 2400 तर सरासरी 2000 ते 2100 रुपये भाव मिळाला. 8 दिवसांच्या कोंडीनंतर कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT