महाराष्ट्र

नंदुरबार : अवकाळी पावसाचा जोर वाढला; पिकांचे नुकसान, गारठा वाढला

नंदुरबार : अवकाळी पावसाचा जोर वाढला; पिकांचे नुकसान, गारठा वाढला

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. यात रात्री पावसाचा जोर वाढल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर पावसामुळे थंडीत देखील वाढ झाली आहे.

मिरची, कापसाचे नुकसान

वातावरणातील बदलानुसार आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहण्याची शक्यता दिसत असल्याने काढणीला आलेल्या कापूस, मिरची तसेच पपई, केळी, भात, ओवा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कृउबात खरेदी बंद

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन दिवसापूर्वीच मिरचीसह इतर कडधान्यांची खरेदी बंद ठेवून शेतकरी, व्यापाऱ्यांना अलर्ट केले होते. मात्र पथारीवर सुकवण्यासाठी टाकलेल्या ओल्या लाल मिरचीची अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात व्यापार्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २५ मिनिटे उशिरा

पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! प्रवासाचा वेळ वाचणार, या दिवशी सुरू होणार लोकल, कोणती असतील स्थानकं?

Success Story : नकोशीनं कुटुंबाचं नाव केलं! सासरच्यांमुळे ती IAS झाली, आता अमरावतीची कलेक्टर; वाचा संजीता महापात्रा यांचा प्रवास

Sparrow Behavior: चिमणी कोणतं अन्न खाते? ही माहिती वाचून बसेल धक्का

Thursday Horoscope: करिअरमध्ये नवीन संधी येणार; पण जास्त कष्ट घ्यावे लागणार, 'या' राशींच्या व्यक्तींना कर्मचाऱ्यांकडूनच त्रास होणार

SCROLL FOR NEXT