महाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर येथे प्रथमच फडकला तिरंगा

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर येथे प्रथमच फडकला तिरंगा

साम टिव्ही ब्युरो

शनिमांडळ (नंदुरबार) : तालुक्यातील आसाणेपासून तीन किमी अंतरावर जंगलात मेंढ्या चारणारा समाज हा ठेलारी समाज म्हणून ओळखला जातो. या भागात स्‍वातंत्र्यानंतर प्रथमच ध्‍वजारोहणचा कार्यक्रम झाला. (nandurbar-news-first-time-after-75-years-of-independence-the-tricolor-was-hoisted-here)

ठेलारी समाज ज्या भागात चारा असेल; त्या भागात स्थलांतर करत असतो. परंतु आसाणे येथे मूळ ठिकाण असलेल्या ठेलारपाडा वस्ती ठिकाणी शेती व घर स्थायिक केले आहेत. पण तरीही सहा महिने पावसाळ्याचे येथे शेती व चाऱ्यासाठी राहतात अन्‌ सहा महिने उन्हाळ्याचे जिकडे पाणी व हिरवा चारा उपलब्ध होईल तिकडे स्थलांतर करतात. नेमकी हीच गोष्ट आसाणे येथील भारत पाटील, रवींद्र कांचन पाटील, सावळीराम ठेलारी, सखाराम ठेलारी, मंगा ठेलारी, अरुण पाटील, समाधान पाटील, आत्माराम पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांनी हेरली व वर शासन दरबारी तत्कालीन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल व खासदार हिना गावित व आमदार विजयकुमार गावित यांना पाठपुरावा करून जिल्हा परिषद मार्फत ठेलारपाडा वस्तीवर प्राथमिक शाळा मजूर करून हक्काची शाळा मिळवून दिली.

ठेलारी ज्‍येष्‍ठ नागरीकाच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण

कधी काळी शालेय शिक्षणापासून वंचित असणारा मेंढपाळ समाज, जागा मिळेल तेथे चूल मांडणाऱ्या समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. तेथील समाजाला हक्काचा स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा मिळाला. याप्रसंगी थेतील ज्येष्ठ नागरिक घमा ठेलारी यांना झेंडावंदन करण्याचा मान देण्यात आला. प्रथमच झालेल्‍या या कार्यक्रमामुळे नागरीकांमध्‍ये देखील उत्‍साह होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतल्या साकीनाका येथे गारमेंट गोदामाला आग

Maharashtra News: विहीर चोरीला गेली, तरुण शेतकऱ्याने शेतातच मृत्यूला कवटाळलं

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल २९ खाती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती मिळाली खाती?

कल्याण RTOची दमदार कामगिरी, ४०० कोटींहून अधिक महसूल जमा

धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT